एक वेळ अशी येते,
जेव्हा एकटेपणालाही कोणीतरी यावं, हात धरावा,
अशी अपेक्षा राहत नाही.
तो फक्त शांतपणे तिच्या शेजारी येऊन बसतो.
ती उघडत जाते एकेक खिडकी,
संवादांची...
एकेक नाव...
उत्तरांच्या शोधात???
नाही, नाही...
अशा एका जागेच्या शोधात,
जिथे तिचं मन पोहोचल्याबद्दल तिला वाईट वाटत नाही.
आणि जेव्हा अशी एकही जागा सापडत नाही,
तेव्हा ती एकेक खिडकी अलगद बंद करत जाते...
एक दीर्घ उसासा,
...आणि मग पुन्हा
ती स्वप्नांच्या वाटेवर निघून जाते.
कारण तीच एक जागा असते,
जिथे तिचं फक्त असणं
पुरेसं असतं.

© सोनल थोरवे 

No comments:
Post a Comment