माणूस short-cut शोधण्याच्या नादात big-time रस्ते चुकतो तेव्हा…
Google बाई काय, धोपट मार्ग सांगते, म्हणून तिच्यावरचा अविश्वास आड येतो. उगाच आपला शहाणपणा (1.5🤐) test करायचा म्हणून आधीच्या माहितीच्या जोरावर डोकं लढवून 'ह्याला समांतर हीच गल्ली, तिकडेच जायला हवी', वगैरे अंदाज बांधतो. आणि मग माणूस गल्लीबोळांतून मार्ग शोधत dead end ला पोहोचतो.
नशीब, इतर माणसांशी बोलता येतं म्हणून... मग कोण्या मावशी, काकांना आपल्या destination चा मार्ग विचारतो. त्यांनी सांगितलेल्या गल्लीबोळांतून कुठून कसं कोणास ठाऊक ओळखीच्या कोण्या रस्त्याला लागतो, आणि कसं हुश्श होतं. Short-cut च्या नादात माणसाचे petrol, वेळ आणि energy असं बरंच काही extra खर्च होतं.
ठीकच आहे म्हणा... कधी आयुष्यात फिरकण्याचा विचार नसेल केला अशा नवीन गल्ल्या पाहिल्याचं उगाच समाधान. त्यात एखादी गल्ली छानशा नदीकाठावर वसलेली असते. आत जाताना उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त दिसल्याने मनात 'रस्ता चुकीचा असावा' अशी पाल चुकचुकलेली असते. पण, आपलं उजवीकडे नदी, डावीकडे छोटीशी घरं, आणि पुढे हिरवीगार शांतता, दगडी मंदिरं आणि मंदिराबाहेर समोरच्या ओसरीखाली निवांत वर्तमानपत्र वाचत बसलेले पांढरा शुभ्र कुर्ता-पायजमा परिधान केलेले आजोबा... असं वाटतं, गाडी आपोआपच आपल्याला घेऊन पुढे जाते आहे.
असो... Dead-ends कितीही भुरळ पाडणारे असले तरी नोकरदार माणसांना परवडणारे कुठे असतात? माणसाला u-turn घेऊन मार्ग शोधण्यावाचून पर्याय नसतो. माणूस आपापल्या कार्यालयात पोहोचतो खरा... पण, तिकडे न पोहोचवणाऱ्या, शांत, निवांत सुद्धा जग असू शकतं हे दाखवणाऱ्या गल्ल्यांची, माणसांची चित्रं मनात साठवून. ठीक आहे, आपले मार्गच रहदारीचे... म्हणून, दूरवर दडलेल्या शांत वाटांच्या वाटेला कधी जाऊच नये असं कुठे कोणी सांगितलं आहे? क्षणभर का असेना, मनाला तेवढीच काय ती विश्रांती.
मला वाटतं, चुकावेत कधी तरी रस्ते... माणसाला नक्की कशाची ओढ आहे, आणि कशाची गरज आहे याचा एक reminder मिळतो. गरजेच्या गोष्टींबद्दल तकतक करणं आपोआप बंद होतं, आणि ओढीकडे सुद्धा अधूनमधून वेळ काढून डोकवावं याचाही नव्याने साक्षात्कार होतो.
माणूस short-cut शोधण्याच्या नादात big-time रस्ते चुकतो तेव्हा कदाचित त्या short time interval मध्ये तो big-time कुठे तरी अंतरातले योग्य मार्ग धरून दूरवर फिरून आलेला असतो.
✍⚡ सोनल थोरवे

No comments:
Post a Comment